● वडिलांचे अधूरे स्वप्न लेकीने केले पूर्ण
सोलापूर : सोलापुरातील शेतकऱ्याच्या लेकीने उत्तुंग भरारी मारली आहे. एमपीएससीच्या दोन परीक्षा, पहिल्याच प्रयत्नात पास होऊन वडिलांचे अधूरे स्वप्न या लेकीने पूर्ण केले आहे. Farmer’s daughter’s success: Two MPSC exams, pass in first attempt Solapur Madha
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक हे अधिकाऱ्यांचे आणि बुद्धिवंतांचे गाव म्हणून सर्वत्र ओळखलं जाते. या गावातील १५०० लोक विविध सरकारी पदावर कार्यरत आहेत. याच गावातील दुग्ध व्यवसायिक आणि शेतकरी असणाऱ्या हनुमंत डुचाळ यांची कन्या धनश्री डुचाळ हीने विक्रीकर निरीक्षक आणि मंत्रालय सहाय्यक कक्ष अधिकारी या दोन्ही परीक्षेत एकाच वेळी घवघवीत यश मिळवत आपल्या वडिलांचे अधिकारी होण्याचे अधुरे राहिलेले स्वप्न लेकीने साकार केले आहे.
धनश्रीचे आई वडील हे दोघेही शेतकरी असून शेतीवरच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. धनश्रीचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत तर माध्यमिक शिक्षण नंदीकेश्वर विद्यालयात झाले. तर पदवीचे शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथे आणि पदवीत्तर शिक्षण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर येथून पुर्ण केले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
तिने चौथीच्या शिष्यवृत्ती परिक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. वडील हनुमंत डुचाळ यांनी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. परंतु परिस्थिती नाजूक असल्याने ते त्यांना शक्य झाले नव्हते. परंतु लेकीने जिद्द व चिकाटीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात दोन्ही परिक्षेत घवघवीत यश मिळवून वडिलांचे अधूरे राहिलेले स्वप्न साकार केल्याने तिच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आई, वडिलांनी काबाडकष्ट करून मला शिक्षणासाठी मोठे बळ दिले. त्यांचे स्वप्न पुर्ण करण्याची जिद्द मनात ठेवून अभ्यास केला तर गावातील आयएएस रोहिणी भाजीभाकरे, पोलीस उपायुक्त डॉ. संदिप भाजीभाकरे, डॉ. अश्विनी वाकडे, आयएएस स्वप्नील पाटील, तहसीलदार अमरदिप वाकडे, आरटीओ श्रीकृष्ण नकाते यांचे सतत मोलाचे मार्गदर्शन लाभले.. या सर्वांच्या पाठबळावरच मला हे यश मिळाले असल्याचे धनश्री डुचाळ यांनी सांगितले.
● शेतकऱ्यांची एवढी थट्टा करु नका रे ?
सोशल मीडियावर एक पावती व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका शेतकऱ्याला 205 किलो कांदा विकल्यानंतर फक्त 8.36 रुपये मिळाले. व्हायरल होत असलेली ही पावती कर्नाटकातील एका शेतकऱ्याची आहे, ज्याने कांदा विकण्यासाठी 415 किमीचा प्रवास करून यशवंतपूर (बंगळुरू) गाठले. येथे त्याला ₹200 / क्विंटल या दराने एकूण ₹410 मिळणार होते, पण व्यापाऱ्याने मजुरी ₹24 व मालवाहतुकीसाठी ₹377.64 कापून शेतकऱ्याला फक्त ₹8.36 दिले.