Thursday, September 28, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

निमित्त महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचे, चर्चा अजिदादांच्या बंडखोरीची

On the occasion of the Maharashtra Bhushan Award ceremony, the discussion was about the political rebellion of Ajitdada

Surajya Digital by Surajya Digital
April 18, 2023
in Hot News, महाराष्ट्र, राजकारण
0
निमित्त महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचे, चर्चा अजिदादांच्या बंडखोरीची
0
SHARES
132
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

○ अमित शहांच्या मुंबई भेटीची इनसाईड स्टोरी

 

मुंबई : महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी मोठी राजकीय उलथापालथ होऊन सत्तांतर झाले. शिवसेनेत उभी फूट पडली आणि उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद जाऊन एकनाथ शिंदे भाजपच्या मदतीने राज्याचे मुख्यमंत्री झाले. मात्र या सत्तांतरानंतरही राज्यातील स्थिती अस्थिर असून महाराष्ट्रातील जनतेला राजकीय भूकंपाचा नवा अंक अनुभवण्यास मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. On the occasion of the Maharashtra Bhushan Award ceremony, the discussion was about the political rebellion of Ajitdada

 

यावेळी राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू हा शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असू शकतो, असे बोलले जात आहे. कारण राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेतल्याची चर्चा आहे. तसेच अमित शहा यांनी झालेल्या मुंबई दौऱ्यात राष्ट्रवादीतील एका गटाला सत्तेत सामावून घेण्याबाबत आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्याचे समजते.

 

खरंतर अमित शहा हे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर झालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी महाराष्ट्रात आले होते. मात्र, रविवारी हा पुरस्कार प्रदान सोहळा असताना शहा हे शनिवारी रात्रीच मुंबईत दाखल झाले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी पक्षातील नेत्यांना विश्वासात घेत नव्या राजकीय समीकरणांची माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट फोडण्यासाठी शहा यांनी हालचाली सुरू केल्या असल्याचे खात्रीलायकरीत्या समजते.

 

आमच्या पक्षातील काही सहकाऱ्यांवर पक्षांतरासाठी दबाव असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कबूल केल्याचा दावा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्याकडून राष्ट्रवादीचा एक गट फोडण्यासाठी प्रयत्न सुरू असण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीतून फुटणाऱ्या गटात कोण कोण असेल, त्याचे नेतृत्व कोण करेल तसेच त्याला सत्तेतील वाटा कशाप्रकारे देता येईल याची चाचपणी अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान केल्याची माहिती आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

○ भाजपला का हवी राष्ट्रवादीची साथ ?

 

शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर महाविकास आघाडीची ताकद क्षीण झाल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत होता. मात्र अशा स्थितीतही भाजपला आता राष्ट्रवादीची किंवा तेथील एका गटाची साथ का हवी आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, त्याचं कारण आहे आगामी लोकसभा निवडणुका आणि महाविकास आघाडीने निर्माण केलेलं आव्हान.

लोकसभा निवडणुकांना जेमतेम वर्षच उरल्याने त्यादृष्टीने केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाने रणनीती आखायला सुरुवात केली आहे. राज्यात लोकसभेच्या ४८ जागा असून मागच्या लोकसभा निवडणुकीत त्यातील ३५ जागा भाजप-शिवसेना युतीने जिंकल्या होत्या.

केंद्रातही शिवसेना भाजपसोबत असल्याने त्यांच्या खासदारांचा पाठिंबा होता. मात्र, आता उध्दव ठाकरेंची शिवसेना सोबत नसल्याने त्यांच्याशिवाय राज्यात पुन्हा तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त खासदार निवडून आणणे हे भाजपसमोर मोठं आव्हान आहे आणि राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांची महाविकास आघाडी बनली असून त्यांनी या आव्हानामध्ये अधिक भर घातली आहे. अशावेळी लोकसभा निवडणुकीपूर्वी ही आघाडी कोणत्याही परिस्थितीत भाजपला फोडायची असून त्यासाठीच राष्ट्रवादीमधील आमदारांचा एक मोठा गट गळाला लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्वतः अमित शहा यांनी यासाठी पुढाकार घेतला असून त्यासाठी आवश्यक ती सर्व बोलणी त्यांनी केल्याचे समजते.

 

विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मात्र यासंबंधीची कोणतीच कल्पना भाजपकडून देण्यात आली नसल्याचंही समजते. दरम्यान, एकीकडे भाजपकडून या हालचाली सुरू असताना मी अमित शहा यांची भेट घेतली नसल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात खरंच राजकीय भूकंप होणार का आणि असा भूकंप झालाच तर त्याचे स्वरूप नेमके कसे असणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

Tags: #On #occasion #MaharashtraBhushan #Award #ceremony #discussion #political #rebellion #Ajidada #ajitpawar#निमित्त #महाराष्ट्रभूषण #पुरस्कार #सोहळा #चर्चा #अजिदादा #बंडखोरी #राजकारण
Previous Post

आप्पासाहेब म्हणाले, घटना दुर्दैवी त्याचे राजकारण करू नका, मृत श्री सदस्यांच्या कुटुंबीयांचे सात्वंन

Next Post

श्री स्वामी पुण्यतिथी : वटवृक्ष देवस्थान… हजारो भक्तांच्या सहभागाने रंगला स्वामींचा पालखी सोहळा

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
श्री स्वामी पुण्यतिथी : वटवृक्ष देवस्थान… हजारो भक्तांच्या सहभागाने रंगला स्वामींचा पालखी सोहळा

श्री स्वामी पुण्यतिथी : वटवृक्ष देवस्थान... हजारो भक्तांच्या सहभागाने रंगला स्वामींचा पालखी सोहळा

Latest News

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

by Surajya Digital
September 15, 2023
0

...

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

by Surajya Digital
September 12, 2023
0

...

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20  कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

by Surajya Digital
August 17, 2023
0

...

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

by Surajya Digital
August 10, 2023
0

...

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

by Surajya Digital
August 9, 2023
0

...

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

मोदींना चोर म्हटल्यावर राहुल गांधी वर गुन्हा दाखल होतो तर भिडेंवर का नाही? – राजू शेट्टी

मोदींना चोर म्हटल्यावर राहुल गांधी वर गुन्हा दाखल होतो तर भिडेंवर का नाही? – राजू शेट्टी

by Surajya Digital
August 5, 2023
0

...

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com

Categories

  • Hot News
  • Techनिक
  • Uncategorized
  • Videos
  • अर्थाअर्थ
  • खेळ
  • गुन्हेगारी
  • टॉलीवुड
  • देश – विदेश
  • ब्लॉग
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिवार
  • सोलापूर

वार्ता संग्रह

April 2023
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Mar   May »
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697