Monday, January 30, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

महाराष्ट्रातील घटना व्यथित करणाऱ्या; राणा दाम्पत्यावरील कारवाईवर भाजप आक्रमक

फडणवीसांचे ट्वीटवर ट्वीट

Surajya Digital by Surajya Digital
April 23, 2022
in Hot News, महाराष्ट्र, राजकारण
0
महाराष्ट्रातील घटना व्यथित करणाऱ्या; राणा दाम्पत्यावरील कारवाईवर भाजप आक्रमक
0
SHARES
154
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई : राणा दाम्पत्याला झालेल्या अटकेवरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘भाजपाच्या पोलखोल रथावर हल्ले: आरोपी अटकेत नाही, मोहित भारतीय यांच्यावर हल्ला: साधा गुन्हा दाखल नाही, महिला लोकप्रतिनिधीला 20 फूट गाडण्याची भाषा : साधी दखल सुद्धा नाही, हनुमान चालिसा पठनाला राणा दाम्पत्य येतात तर : थेट अटक,’ असे ट्विट फडणवीस यांनी केले आहेत.

राणा दाम्पत्यावरील कारवाईनंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर ट्विटरवरून जोरदार टीका केली आहे.

कालपासून मातोश्रीच्या शिवसैनिकांनी घेरावबंदी करत राणा दाम्पंत्यांनी येथे येऊन दाखवावे असे म्हटले होते. यानंतर कायदा आणि सुव्यवस्था टिकावी म्हणून मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालिसा वाचण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. यादरम्यानच काल मोहित कंबोज यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. दरम्यान, आज नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना भादंवि कलम 153 अ अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

त्यावरून आता माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे यांच्यावर तोफ डागली आहे. यावेळी त्यांनी ट्विटरवरू ट्विट करताना, ठाकरे सरकारला काही सवाल केले आहेत. तसेच महाराष्ट्रातील घटना व्यथित करणार्‍या आहेत, असे म्हटलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्ला करताना, ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी भाजपच्या पोलखोल रथावर हल्ले : आरोपी अटकेत नाही. मोहित भारतीय यांच्यावर हल्ला झाला त्याविरोधात साधा गुन्हा दाखल नाही. महिला लोकप्रतिनिधीला 20 फूट गाडण्याची भाषा करण्यात आली याची साधी दखल सुद्धा घेण्यात आलेली नाही. तर हनुमान चालिसा पठनाला राणा दाम्पत्य येतात तर त्यांना थेट अटक करण्यात येते. या महाराष्ट्रातील घटना व्यथित करणार्‍या आहेत, असे म्हटले आहे.

Incidents in Maharashtra distressing; BJP aggressive on action against Rana couple

महाराष्ट्रातील घटना व्यथित करणार्‍या आहेत.

➡️ भाजपाच्या पोलखोल रथावर हल्ले : आरोपी अटकेत नाही

➡️ मोहित भारतीय यांच्यावर हल्ला : साधा गुन्हा दाखल नाही

➡️ महिला लोकप्रतिनिधीला 20 फूट गाडण्याची भाषा : साधी दखल सुद्धा नाही

➡️ हनुमान चालिसा पठनाला राणा दाम्पत्य येतात तर : थेट अटक

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 23, 2022

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

आपल्या एका दुसऱ्या ट्विटमध्ये इतकी दंडुकेशाही? इतका अहंकार? इतका द्वेष? सत्तेचा इतका माज? सरकारच करणार हिंसाचार. एवढीच तुमची मदुर्मकी? सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या. पण, जनता सारे काही पाहते आहे ! असे म्हटलं आहे. तसेच त्यांनी, निव्वळ लज्जास्पद असल्याचे म्हटले असून लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार संपल्याचे लिहले आहे. तर लोकशाहीचे गार्‍हाणे गाणारे आज सोयीस्कर गप्प का? असा सवाल उपस्थित केला आहे.

दरम्यान याच्या आधी फडणवीस यांनी, मोहित कंबोज यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे डरपोक लोकांनी सत्तेच्या भरवशावर केलेला उन्माद असल्याचे म्हटले होते. महाराष्ट्रात सरकारच्या भ्रष्टाचारावर बोलाल तर तुम्हाला जिवे मारू, ही नवी संस्कृती सुरू झाली आहे. पण तरीही महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराविरुद्ध हा लढा थांबणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते.

यावर आता मुंबई पोलिस या हल्लेखोरांवर कारवाई करणार की एखादे कथानक रचून, या भेकड हल्लेखोरांना वाचविणार? असा सवाल उपस्थित केला होता. तसेच मुंबई शहरात आपण सीसीटीव्हीचे जाळे सर्वत्र उभारले आहे, त्यातून संपूर्ण सत्य बाहेर येईलच, असेही त्यांनी म्हटले होते. तर मोहित कंबोज यांच्यावर झालेला हल्ल्याचा तीव्र निषेध करताना दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राणा दांपत्याच्या अटकेवर प्रतिक्रीया देतांना महाराष्ट्रात कायदा सुव्यस्थेची परिस्थिती पुर्ण बिघडली असल्याचे सांगत महाविकास आघाडीवर टीका केली. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राणा दांपत्याच्या अटकेवर प्रतिक्रीया देतांना म्हटले की, राणा दांपत्याला अटक केल्याबद्दल राज्यातील रावणराज्याचा निषेध…तसेच घोटाळेबाज उध्दव ठाकरे सरकारचे दहन होण्याच्या शक्यतेमुळे घाबरले आहे. त्यामुळे रात्री वा मी खार पोलिस स्टेशनला भेट देण्यासाठी जाणार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले.

Tags: #Incidents #Maharashtra #distressing #BJP #aggressive #action #Rana #couple#महाराष्ट्र #घटना #व्यथित #राणा #दाम्पत्य #कारवाई #भाजप #आक्रमक
Previous Post

अक्कलकोट : अवकाळीने झोडपले, बोरगावमध्ये गारपीट; कलिंगड, टरबूज, आंब्याचे नुकसान

Next Post

किरीट सोमय्यांच्या गाडीवर हल्ला

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
किरीट सोमय्यांच्या गाडीवर हल्ला

किरीट सोमय्यांच्या गाडीवर हल्ला

वार्ता संग्रह

April 2022
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  
« Mar   May »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697