Tuesday, February 7, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

जमीन खरेदी करणा-यांसाठी बातमी, ‘तुकडाबंदी’ बाबत न्यायालयाचा मोठा निर्णय

News for land buyers, big court decision regarding 'fragmentation'

Surajya Digital by Surajya Digital
May 6, 2022
in Hot News, महाराष्ट्र
0
जमीन खरेदी करणा-यांसाठी बातमी, ‘तुकडाबंदी’ बाबत न्यायालयाचा मोठा निर्णय
0
SHARES
350
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

औरंगाबाद :  जमीन खरेदी करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. जमीन खरेदी करताना तुकडाबंदीचा मोठा अडसर ठरत होता. मात्र औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यामुळे आता तुकडा बंदीमुळे होणारा त्रास संपण्यास मदत होणार आहे. News for land buyers, big court decision regarding ‘fragmentation’

जमिनीचा पट्टा 1 एकर असेल तर त्याचे तुकडे करुन त्यातील 1 ते 2 गुंठे जमीन विकता येत नव्हती, असा नियम आहे. त्याचे रजिस्ट्री होत नव्हती. जमिनीचे ले आऊट केले तरच रजिस्ट्रेशनची मुभा होती, अथवा जिल्हाधिकारी परवानगीने रजिस्ट्रेशन होऊ शकत असे. मात्र याचे नियम आता औरंगाबाद खंडपीठाने रद्द केले आहेत. त्यामुळे जमीन खरेदी करतानाचा हा येणार अडसर दूर होणार आहे.

आता काही तुकड्यात तुम्हाला जमीन खरेदी करता येणार आहे. तीन गुंठ्यांची अट आता असणार नाही. कारण तुकडा बंदीचे नियम औरंगाबाद खंडपीठाकडून रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे खरेदीखत नोंदणीचे व्यवहार सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तुकडा बंदी नियमामुळे होणारा त्रास संपणार आहे. आता 1-2 गुंठे जमिनीचा व्यवहार करता येणार आहेत.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

राज्यातील तुकडा बंदीचे नियम आणि परिपत्रक औरंगाबाद खंडपीठानं रद्द केलेत. त्यामुळे आता खरेदीखत नोंदणीचे व्यवहार सुरु होण्याच्या मार्ग मोकळा झालाय. राज्य मुद्रांक विभागाने 12 जुलै 2021 पासून जमीन तुकडाबंदी नियम लागू केले होते. त्यात एन ए 44 जमीन वगळता इतर सर्व घरे, प्लॉट रजिस्ट्री बंद होती.

जमिनीचे तुकडे करुनही विकता येत नव्हते. त्याची रजिस्ट्री बंद होती. यासाठी महाराष्ट्र नोंदणी नियम क्रमांक 44 (1) (ई) हा नियम ठेवला होता. त्यामुळं अशा घर आणि जमिनीची विक्री खरेदी व्यवहार नाईलाजानं बॉण्ड पेपरवर व्हायला लागली होती. या विरोधात काही लोकांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका केली होती. त्यावर औरंगाबाद खंडपीठानं हा निर्णय दिलाय. त्यामुळं आता तुकडा बंदीमुळे होणारा त्रास संपणार आहे.

 

Tags: #News #land #buyers #big #court #decision #fragmentation#जमीन #खरेदी #बातमी #तुकडाबंदी #न्यायालय #मोठा #निर्णय
Previous Post

पंढरपूरमध्ये मुलाला मारून आईने घेतला गळफास; परिसरात खळबळ

Next Post

तृतीयपंथीना नावनोंदणीसाठी आता प्रमाणपत्राची गरज नाही; सोलापूर जिल्ह्यात 179 तृतीयपंथी मतदार

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
municipal elections नगरपरिषदा निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज; दहा नगरपरिषदांची अंतिम प्रभाग रचना तयार

तृतीयपंथीना नावनोंदणीसाठी आता प्रमाणपत्राची गरज नाही; सोलापूर जिल्ह्यात 179 तृतीयपंथी मतदार

वार्ता संग्रह

May 2022
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Apr   Jun »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697