Monday, February 6, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

भारतात कोरोनाने 47 लाख लोकांचा मृत्यू झाला, WHO चा वेगळाच दावा, भारताने घेतला आक्षेप

WHO claims otherwise, India objects

Surajya Digital by Surajya Digital
May 6, 2022
in Hot News, देश - विदेश
0
भारतात कोरोनाने 47 लाख लोकांचा मृत्यू झाला, WHO चा वेगळाच दावा, भारताने घेतला आक्षेप
0
SHARES
45
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नवी दिल्ली : कोरोनाने भारतात 5 लाख जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) वेगळाच दावा केला आहे. भारतात कोरोनामुळे एकुण 47 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचे WHO ने म्हटले आहे. पण भारताने आक्षेप घेतला आहे. Corona kills 47 lakh people in India, WHO claims otherwise, India objects

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोरोना मृत्यूबाबत जारी केलेल्या अहवालावरून शंका उपस्थित करण्यात येतेय. यामध्ये एक आक्षेप खुद्द भारतानेच नोंदवला आहे. डब्ल्यूएचओने जाहीर केलेल्या आकडेवारीवर, विश्वास ठेवता येणार नाही, असं स्पष्ट म्हटले आहे. या अहवालावर भारत सरकारने आक्षेप घेतला आहे. जागतिक आरोग्य संघटना चीनच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप अमेरिकेचा आहे. कोरोनाबाबत जागतिक आरोग्य संघटना जगाची दिशाभूल करत असल्याचेही अमेरिकेचे म्हणणे आहे.

डब्ल्यूएचओ प्रमुख टेड्रोस एडनॉम गेब्रेयसस यांनी हा आकडा गंभीर असल्याचं म्हटलं आहे. यातून देशांनी धडा घ्यावा, असं त्यांनी म्हटलं आहे. भविष्यातील आरोग्याशी संबंधित आणीबाणीचा सामना करण्यासाठी देशांनी आरोग्य सेवांशी निगडीत क्षेत्रात अधिक गुंतवणूक करावी असा सल्ला त्यांनी दिला आहे.

जगभरात गेली दोन वर्ष कोरोनाने थैमान घातलं. कोरोना जगभरात करोडो लोकांचा मृत्यू झाला. आता जागतिक आरोग्य संघटनेने याचा अहवाल समोर आणला आहे. या अहवालाननुसार गेल्या दोन वर्षात जगभरात सुमारे 15 दशलक्ष लोकांनी कोरोनाव्हायरसमुळे किंवा आरोग्य प्रणालींवर झालेल्या परिणामांमुळे आपले प्राण गमावले आहेत. विविध देशांनी दिलेल्या अधिकृत आकडेवारीपेक्षा हा आकडा दुप्पट आहे. यापैकी बहुतेक मृत्यू दक्षिणपूर्व आशिया, युरोप आणि अमेरिकेत झाले आहेत. तर भारतात हा आकडा 47 लाख इतका आहे. अधिकृत आकडेवारीपेक्षा हा आकडा 10 पट जास्त आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

WHO ने काही तज्ज्ञांना कोरोना काळात झालेल्या मृत्यूच्या वास्तविक संख्येचं मूल्यांकन करण्याची जबाबदारी दिली होती. या तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार, 1.33 कोटी ते 1.66 कोटी लोकांचा मृत्यू एकतर कोरोना विषाणूमुळे झाला आहे किंवा या काळात आरोग्यसेवेच्या कमतरतेमुळे झाला आहे. ही आकडेवारी देशांनी दिलेल्या डेटावर आणि सांख्यिकीय मॉडेलिंगवर आधारित आहे. डब्ल्यूएचओने कोविड-19 मुळे झालेल्या मृत्यूचे तपशील थेट दिलेले नाहीत.

भारताने कोविड-19 मुळे होणाऱ्या मृत्यूंचा अंदाज लावण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला भारत सरकारने कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची नवीन आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2020 मध्ये 4,74,806 अधिक मृत्यू झाल्याचे दिसून आले. भारताने २०२१ साठी मृत्यूचा अंदाज जाहीर केलेला नाही.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अंदाज सादर करण्यासाठी गणितीय मॉडेल्सच्या वापरावर भारताने जोरदार आक्षेप घेतला. मॉडेल्सची वैधता आणि डेटा संकलनाची पद्धत संशयास्पद असल्याचं भारताने म्हटलं आहे. भारताने म्हटलं आहे की डब्ल्यूएचओने अतिरिक्त मृत्यूचे अंदाज जारी केले आहेत. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार कोविडमुळे किंवा आरोग्य सेवांवर त्याचा परिणाम झाल्यामुळे भारतात 47 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

डॉ. गुलेरिया यांनी तीन मोठी कारणं दिली आहेत, ज्यामुळे WHO अहवालावर विश्वास ठेवता येत नाही. त्यांचं म्हणणं आहे की, भारतात जन्म-मृत्यू डेटा रेकॉर्ड करण्याचा एक पद्धतशीर मार्ग आहे, ज्यामध्ये कोविड वगळता सर्व प्रकारचे मृत्यू रेकॉर्ड केले जातात. तर हा डेटा जागतिक आरोग्य संघटनेने वापरलेला नसल्याचे म्हटले आहे.

 

Tags: #Corona #kills #47lakh #people #India #WHO #claims #India #objects#भारत #कोरोना #47लाख #लोक #मृत्यू #डब्ल्यूएचओ #दावा #भारत #आक्षेप
Previous Post

college girl killed सोलापूर : कंटेनरची दुचाकीस धडक, कॉलेजयीन तरूणी जागीच ठार

Next Post

कंटेनर – रिक्षाच्या धडकेत सातजणांचा मृत्यू, 4 गंभीर जखमी

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
कंटेनर – रिक्षाच्या धडकेत सातजणांचा मृत्यू, 4 गंभीर जखमी

कंटेनर - रिक्षाच्या धडकेत सातजणांचा मृत्यू, 4 गंभीर जखमी

वार्ता संग्रह

May 2022
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Apr   Jun »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697