Tuesday, February 7, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

organic farming चंद्रभागेचे प्रदूषण रोखण्यासाठी नमामी चंद्रभागाअंतर्गत नदीकाठी होणार सेंद्रीय शेतीचा जागर

To prevent pollution of Chandrabhaga, there will be awareness of organic farming along the river under Namami Chandrabhaga

Surajya Digital by Surajya Digital
May 12, 2022
in Hot News, शिवार, सोलापूर
0
organic farming चंद्रभागेचे प्रदूषण रोखण्यासाठी नमामी चंद्रभागाअंतर्गत नदीकाठी होणार सेंद्रीय शेतीचा जागर
0
SHARES
70
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

□ चंद्रभागेचे प्रदुषण रोखण्यासाठी शासकीय योजनांचा कृतीसंगम -सिईओ दिलीप स्वामी

□ नमामी चंद्रभागा अंतर्गत नदीकाठी सेंद्रीय शेतीचा जागर ..!

सोलापूर – नमामी चंद्रभागा अंतर्गत भीमा नदीचे प्रदुषण रोखणे साठी नदीकाठच्या शेती सेंद्रिय करणेसाठी अभियान हाती घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. To prevent pollution of Chandrabhaga, there will be awareness of organic farming along the river under Namami Chandrabhaga

जिल्हा परिषदेत आज भीमा नदी काठच्या गावात प्रदूषण रोखण्यासाठी करावयाच्या उपाय योजना बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जिल्हा कृषी अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. नवनाथ नरळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, तसेच कृषी विस्तार अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नमामी चंद्रभागा हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वोपतरीने प्रयत्न करणेत येत आहे. भीमा नदी काठच्या शेतीमध्ये होणारे रासायनिक खतांचा वापर कमी करून त्यांना सेंद्रीय शेतीकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

 

घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत पशुपालन करणारे शेतकरी यांचे असलेले पशुच्या मल- मुत्राचे व्यवस्थापन करणेसाठी गांडुळखत प्रकल्प, स्लरी, तसेच कचरा पासून कंपोस्ट खत तयार करणे, गोबर गॅस, गोबरधन बाबत जनजागृती करून नदीकाठच्या शेतकरी बांधवांमध्ये जनजागृती करणेत येणार आहे, असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.

 

भीमा नदीकाठी असलेले शेतकरी भिमेच्या पाण्यात जनावरे धुतली जातात, यासाठी दुसरी उपाय योजना काय करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली. नदीचे पात्राच्या बाजूने वृक्षारोपन करून जमिनीची धूप थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी चर्चा करण्यात आली.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

□ नदीकाठच्या गावात शेतकरी मेळाव्याचे आयोजन

 

भीमा नदी काठच्या गावात शेतकरी मेळावे घेऊन त्यांना शेतकरी यांना घनकचरा व्यवस्थापन व सेंद्रिय शेती बाबत मार्गदर्शन करणेत येणार आहे. २० मे नंतर पंढरपूर व माळशिरस तालुक्यात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.

 

□ नदीकाठच्या 131 ग्रामपंचायती मध्ये प्रबोधनाचा जागर

 

भीमा नदी काठावर माळशिरस, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, माढा, करमाळा, व दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, या ९ तालुक्यांतून भीमा नदी वाहते. सुरूवातीला पायलट म्हणून दहा गावात ही मोहिम हाती घेणेत येत आहे. पंढरपूर व माळशिरस तालुक्यांतील नमामी चंद्रभागा अंतर्गत निवडलेल्या ग्रामपंचायती मध्ये याची सुरूवात करणेत येणार आहे. शासनाचे विविध योजनांचा कृतीसंगम करून चंद्रभागा प्रदुषणा पासून वाचविणेसाठी अभियान हाती घेणेत येत असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.

 

□ सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आराखडेस सुरूवात – स्मिता पाटील

नदीकाठच्या सर्व ग्रामपंचायतीचा समावेश सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत १३१ ग्रामपंचायतीचा समावेश करणेत आला आहे. सध्या आराखडे बनविण्यास सुरूवात झाली आहे. गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन झाल्यास ब-याच प्रमाणात नदीचे प्रदुषण रोखण्यास मदत होणार आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात या ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी सांगितले.

 

Tags: #prevent #pollution #Chandrabhaga #awareness #organicfarming #river #Namami #Chandrabhaga #solapur#चंद्रभागा #प्रदूषण #रोखणे #नमामी #चंद्रभागाअंतर्गत #नदीकाठी #सेंद्रीयशेती #जागर #सीईओ
Previous Post

युपीतल्या यमुना एक्सप्रेस वेवर अपघात – पुण्याचे पाच जण ठार

Next Post

भीषण कार अपघात, टेकवाणी व्यापारी कुटुंबातील चौघे जण ठार

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
भीषण कार अपघात, टेकवाणी व्यापारी कुटुंबातील चौघे जण ठार

भीषण कार अपघात, टेकवाणी व्यापारी कुटुंबातील चौघे जण ठार

वार्ता संग्रह

May 2022
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Apr   Jun »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697