Friday, September 22, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

‘एप्रिल फूल’ नाही संपकरी कर्मचा-यांनो एसटी महामंडळात मेगाभरती, संप मिटवा

● न्यायालयाचा तसा कोणताही आदेश नाही

Surajya Digital by Surajya Digital
April 1, 2022
in Hot News, महाराष्ट्र
0
‘एप्रिल फूल’ नाही संपकरी कर्मचा-यांनो एसटी महामंडळात मेगाभरती, संप मिटवा
0
SHARES
97
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मुंबई : लवकरच एसटी महामंडळात मेगाभरती होणार आहे. 11 हजार कंत्राटी चालक आणि वाहकांची एसटी महामंडळात भरती करुन घेण्यात येणार आहे. आज हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारवाईपासून दिलासा आहे. उद्यापासून एसटी महामंडळातील हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई होणार आहे. सुमारे 12 हजार लांब आणि मध्यम पल्ल्याच्या मार्गावर प्रति किलोमीटर प्रमाणे भाडेतत्त्वावर बसेस घेऊन चालवण्यात येणार आहेत.

ठाकरे सरकारचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर आजपासून कारवाईला सुरूवात करणार आहे. आतापर्यंत कर्मचाऱ्यांना सातवेळा संधी दिली मात्र कामावर रूजू न झाल्याने 1 एप्रिलपासून कारवाई होणार असल्याचे ते म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याची मुभा संपली आहे. आज जे कर्मचारी हजर झालेले असतील त्यांच्यावर कारवाई करणार नाही, असेही ते म्हणाले.

दरम्यान, अनिल परब यांनी पुढे बोलताना म्हटलंय की, ५ तारखेपर्यंत सेवा समात्त करु नका, असा कुठलाही आदेश न्यायालायाचा नाही. न्यायालयासमोर जो अहवाल ठेवला होता, त्यावर न्यायालयाने कॅबिनेटची मंजुरी मागितली होती. कॅबिनेटची मंजुरी आम्ही घेतली आहे. त्याचा ड्राफ्ट आम्ही कोर्टासमोर सादर करु, कोरोना काळातील स्टेटस मागितला होता, याबाबतचा सगळा डेटा सादर करु, अशीही माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.

एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी जी मुभा दिली होती ती आज ३१ मार्चपर्यंतची होती. आज ती मुदत संपते, आज दिवसाअखेर किती कर्मचारी कामावर हजर झाले, याची आकडेवारी माझ्याकडे येईल. जे कर्मचारी हजर झाले त्यांच्यावर कारवाई होणार नाही. तसेच बडतर्फ आणि सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतलंय.
यांनी दिला आहे. उद्यापासून कामावर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आम्ही कारवाई सुरू करू, असा गंभीर इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलाय.

कंत्राटी कामगारांची भरती केली जाणार आहे. कॅबिनेट बैठकीनंतर परिवहनमंत्री अनिल परब पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे. तसंच आता कंत्राटी पध्दतीवर काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे अनिल परबांनी म्हटले आहे. कोणकोणत्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आणि कुणाकुणाला दिलासा दिला जाणार, याबाबतही मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

No April Fool’s Day..Eliminate mega recruitment strike in Sampakari Karmacharyano ST Corporation

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

३१ मार्चपर्यंतची मुदत आज संपतेय. आज संध्याकाळी माझ्याकडे आकडा येईल. जे हजर झालेत, त्यांच्यावर कुठलीही कारवाई नाही. बडतर्फ, निलंबित होते, जे आज अर्ज घेऊन हजर झाले, त्यांच्यावरची कारवाई मागे घेतली जाईल. मात्र जे हजर झाले नाहीत, त्यांच्यावर कारवाई होणार. आतापर्यंत ७ वेळा मी त्यांना हजर राहण्याचे आवाहन केले होते. असा समज झाला आहे की प्रशासन काहीच करत नाही. हेच पाहता आम्ही ११ हजार कंत्राटी कामगार नेमत आहोत. आमचे रुटस् पण फायनल झालेत, आमच्या १२ हजार फेऱ्या चालतात, त्या नवीन रचनेत बसतील ते सुरू होणार. आता जे कामावर येत नाही, त्यांना नोकरीची गरज नाही असा समज आहे त्यामुळे ते शिक्षेस पात्र आहेत.

□ कंत्राटी कर्मचारी भरले जाणार

नियमानुसार जी कारवाई करायची असते, ती सर्व कारवाई आता केली जाईल, असे अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे. त्यामध्ये निलंबन असेल, बडतर्फी असेल वा सेवासमाप्ती असेल. आज शेवटचा दिवस होता. आमची एसटी कमिटी ठरवते, त्यानुसार ते कंत्राटी कर्मचारी भरले जाणार असल्याचेही अनिल परबांनी म्हटले ५ हजार बस आता धावतात, त्यानंतर आता कंत्राटी कामगारांचा वापर करुन अजून 4 हजार बस चालवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे म्हणत अनिल परब यांनी थेट संपावर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना ठणकावले आहे.

 

□ आता कठोर कारवाई होणार : पवार

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. आंदोलनादरम्यान अनेक एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची आणि बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी ३१ मार्चपर्यंत कामावर परतण्याचे आवाहन केले होते. ३१ मार्चची मुदत संपत आली असून आता १ एप्रिलपासून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. कर्मचाऱ्यांना शेवटचा दिवस कामावर परतण्यासाठी आहे. जे कर्मचारी येणार नाहीत त्यांच्या जागी कंत्राटीपद्धतीने नवीन कर्मचाऱ्यांना घेण्यात येईल असे अजित पवार म्हणाले आहेत.

 

Tags: #NoAprilFool's #Day #Eliminate #megarecruitment #strike #Sampakari #workar #ST #Corporation#एप्रिलफूल #संपकरी #कर्मचारी #एसटी #महामंडळ #मेगाभरती #संप #मिटवा
Previous Post

मोहोळमध्ये युवक शेतक-याने केली आत्महत्या, कुंभारीत खुनाचा गुन्हा दाखल

Next Post

सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, प्रबोधनासाठी सोलापुरात पाच हजार रिक्षांवर लावले स्टिकर

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, प्रबोधनासाठी सोलापुरात पाच हजार रिक्षांवर लावले स्टिकर

सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, प्रबोधनासाठी सोलापुरात पाच हजार रिक्षांवर लावले स्टिकर

Latest News

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

by Surajya Digital
September 15, 2023
0

...

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

by Surajya Digital
September 12, 2023
0

...

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20  कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

by Surajya Digital
August 17, 2023
0

...

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

by Surajya Digital
August 10, 2023
0

...

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

by Surajya Digital
August 9, 2023
0

...

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

मोदींना चोर म्हटल्यावर राहुल गांधी वर गुन्हा दाखल होतो तर भिडेंवर का नाही? – राजू शेट्टी

मोदींना चोर म्हटल्यावर राहुल गांधी वर गुन्हा दाखल होतो तर भिडेंवर का नाही? – राजू शेट्टी

by Surajya Digital
August 5, 2023
0

...

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com

Categories

  • Hot News
  • Techनिक
  • Uncategorized
  • Videos
  • अर्थाअर्थ
  • खेळ
  • गुन्हेगारी
  • टॉलीवुड
  • देश – विदेश
  • ब्लॉग
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिवार
  • सोलापूर

वार्ता संग्रह

April 2022
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  
« Mar   May »
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697