》योजना भाजपची, शुभारंभ विरोधी पक्षाच्या मतदारसंघात
》’आनंदाच्या शिधा’ वाटपावरुन
जिल्हाधिकारी संभ्रमात
सोलापूर : यंदाची गोर गरिबाची दिवाळी गोड करण्यासाठी शिंदे – फडणवीस सरकारने रेशन दुकानदारांच्या माध्यमातून शंभर रूपयामध्ये चार वस्तू देण्याचा निर्णय घेतला. या किटला आनंदाचा शिधा असे नामकरण देखील केले मात्र शिंदे फडणवीस सरकारच्या या योजनेचा सोलापुरात फज्जा उडला असल्याचे चित्र आहे. Solapur. ‘Anandacha Shidha’ scheme has been blown up, only a handful of materials
योजना भाजपची मात्र सोलापुरात विरोधीपक्षाच्या मतदारसंघात वाटपाचे नियोजन करून करण्यात आलेल्या शुभारंभावरून भाजपच्या आमदारांनी जिल्हा प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतल्याने प्रशासानत चांगलाचा गोंधळ उडाला तर जिल्हाधिकारी शिधा वाटपावरून संभ्रमात असल्याचे दिसून आले.
राज्य शासनाच्या आनंदाचा शिधा योजनेचा जिल्हा आणि शहरात मोठ्या प्रमाणत शिधा वाटपाचा शुभारंभ केला. या योजनेचा मोठा गवगवा देखील झाला दिवाळी तोंडावर असल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने मोजके साहित्य आले असताना रात्री उशिरा झोडपट्टी भाग असलेल्या शास्त्रीनगर भागात शिधा वाटपाचा शुभारंभ केला.
वास्तविक पाहता लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत किट वाटपाचा शुभारंभ करण्याच्या सूचना असताना त्याकडे डोळेझाक करत शास्त्रीनगर भागात केलेल्या कीट वाटपाच्या शुभारंभावरुन भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी थेट जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना फोन करून जाब विचारला असल्याचे वृत्त आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
योजना भाजपची, कीट वाटपाचा शुभारंभ मात्र काँग्रेसच्या आमदार असलेल्या शहरमध्य विधानसभा मतदारसंघात का ? असा सवाल विचारत जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी संबधित अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत फैलावर घेतल्यामुळे अधिकाऱ्यांची भंबरी उडाली. याचा परिणाम शहरातील रेशन दुकानात करण्यात येणाऱ्या कीट वाटपावर झाला.
शासकीय गोदामात सर्व वस्तू आल्या मात्र वाटपाचे नियोजन योग्य झाले नाही. अद्याप काही रेशन दुकानदारांकडे कीट पोहचले नाही. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारच्या या योजनेला सोलापुरात खो बसला आहे. काही ८० टक्के दुकानदारांकडे साहित्य पोहचले नाही. त्यामुळे अनेक लाभार्थी शासनाच्या कीडपासून वंचित राहिले असल्याने दिवाळी गोड सोडा अंधारात चालली आहे. दोनच साहित्य दुकानदारांपर्यंत पोहचले आहे. दोनच वस्तू वाटप करा. नंतर दोन आल्यानंतर वाटप करा असे सूचना दुकानदारांना केल्या आहेत.
एकाच कामासाठी दोन वेळा मेहनत आणि कमिशन मात्र तोकडे. त्यामुळे रेशनदुकनदार देखील वैतागले आहे. ग्रामीण भागात कीट वाटपात सावळा गोंधळ दिसून आला. अधिकारी आणि लोकप्रतिनिधी कीट वाटपासाठी एका गावात पोहचले मात्र रेशन दुकानाला चक्क कुलूप असल्याचे दिसून आले तर शहरात सोमवारपासून कीट पोहचणार असल्याने दिवाळी झाल्यानंतर लाभार्थ्यांना मिळणार असेल तर या योजनेचा हेतू सफल होणार कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.